IND VS SA FINAL: टीकाकारांना खेळातूनच हार्दिकचं उत्तर! शेवटच्या ओव्हरमध्ये चमत्कार करत स्वत:ला केलं सिद्ध

T20 World Cup Final: भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २० षटकांत आठ गडी गमावून १६९ धावा करता आल्या. या विजयासह भारताचा ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला. सामन्यात हार्दीकची शेवटची ओव्हर महत्वाची ठरली. या अदभूत खेळीमुळे पांड्याने टीकाकारांना त्याच्या खेळीतून प्रत्युत्तर दिले आहे.

अर्शदीप सिंगने १९व्या षटकात केवळ चार धावा दिल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ६ चेंडूत १६ धावा करायच्या होत्या. हार्दिक पांड्याच्या हाती शेवटचे षटक टाकण्याची धूरा देण्यात आणि हेच षटक महत्वाचे ठरले. काही अंशी हातून गेलेला सामना पांड्याने खेचून आणला. यामुळे आता हार्दिकची सर्वत्र चर्चा होत आहे.

शेवटच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?

हार्दिकने शेवटच्या ओव्हरचा पहिला बॉल मिलरला टाकला. यावर सुर्यकुमार यादवने एक शानदार झेल घेतला. त्यामुळे मिलरला पव्हेलियनमध्ये परतावे लागले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला पाच चेंडूत विजयासाठी १६ धावांची गरज होती. हार्दिकच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. त्यामुळे सगळेच तणावात आले होते. मात्र पुढच्याच तिसऱ्या चेंडूवर सिंगल आला. या दरम्यान पावसाने हजेरी लावली. दोन चेंडूत १० धावा हव्या असताना हार्दिक पंड्याने महत्त्वाच्या क्षणी वाइड बॉल टाकला. दोन चेंडूत 9 धावा हव्या होत्या. त्यानंतर चौथा बॉलवर चमत्कार घडला आणि तमाम भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. या बॉलवर हार्दिकला विकेट मिळाली. त्यामुळे भारत जिंकल्याचे निश्चित झाले. हार्दिकचा शेवटचा बॉलवर सिंगल आला आणि सामना भारताने जिंकला.

हार्दिकने केली टीकाकारांची बोलती बंद

आयपीएल २०२४ पासून हार्दिक चांगलाच टीकेचा धनी बनला आहे. सातत्याचे त्यांच्यावर टीकांचे वार होताना पाहायला मिळाले. यामुळे हार्दिक नैराश्यात गेल्याचे वृत्तही आले होते. स्टेडियममध्येही प्रेक्षकांकडून हार्दिकवर टीका होत होती. मात्र टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत निर्णायक आणि महत्वाची ओव्हर टाकून त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. यामुळे टीका करणाऱ्यांना चोख उत्तर मिळाले आहे. दरम्यान भारताने यापूर्वी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे. १३ वर्षांनंतर कोणीही विश्वचषक जिंकू शकलेले नाही. २०११ मध्ये भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-29T18:58:35Z dg43tfdfdgfd