IND VS SA FINAL : फक्त एकच चेंडू ठरला भारताच्या विजयाचा टर्निंग पॉइंट, सामन्याला कुठे कलाटणी मिळाली जाणून घ्या...

बार्बाडोस : भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना चांगलाच रंगतदार झाला होता. त्यामुळे हा सामना कोण जिंकेल हे सांगता येत नव्हते. पण त्याचवेळी एक चेंडू भारताच्या विजयासाठी टर्निंग पॉइंट ठरला. कारण या एका चेंडूच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला.

जसप्रीतत बुमराहचे १८ वे षटक चांगले पडले. त्यानंतर अर्शदीप सिंगने १९ वे षटक दमदार टाकले. पण त्यानंतर हार्दिकच्या षटकात एक अशी गोष्ट घडली ज्यामुळे हा सामना भारताच्या बाजूने झुकला.

ही गोष्ट घडली ती अखेरच्या षटकात. त्यावेळी हार्दिक गोलंदाजीला आला होता. त्यावेळी भारताच्या विजयाच्या मार्गात सर्वात मोठा अडसर ठरला होता तो डेव्हिड मिलर. कारण तो दक्षिण आफ्रिकेचा एकमेव आश्वासक फलंदाज होता. त्यामुळे मिलरला बाद करणे गरजचे होते. या षटकाच्या पहिल्या चेंडूचा सामना हा मिलर करत होता. त्यामुळे या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सामन्याचा निकाल लागेल, असे म्हटले जात होते. हार्दिकच्या या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मिलर मोठा फटका मारणार, हे सर्वंनाच माहिती होते. त्यामुळे रोहित आणि हार्दिक यांनी यावेळी चांगलीच रणनिती आखली होती. त्यानुसार हार्दिकने यावेळी चेंडू टाकला. या चेंडूवर मोठा फटरा मारण्यासाठी मिलर गेला. यावेळी हा चेंडू हवेत उडाला. त्यामुळे आता हा चेंडू षटाकर जाणार की काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. हा चेंडू षटकार जाणार होता. पण त्यावेळी सूर्यकुमार यादवने कमाल केला. सूर्याने यावेळी अप्रितम झेल पकडला आणि त्यामुळेच भारताला हा सामना जिंकता आला. त्यामुळे हा चेंडू भारताच्या विजयाचा टर्निंग पॉइंट ठरल्याचे पाहायला मिळाले.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा फायनलचा सामना अखेरच्या षटकात आला होता. त्यावेळी कोणता संघ सामना जिंकेल, हे सांगता येत नव्हते. पण अखेरच्या षटकात एक अशी गोष्ट घडली ज्यामुळे हा सामना भारताच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळाले. कारण यावेळी फक्त एक कॅच भारताला वर्ल्ड कप जिंकवून गेली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-29T18:28:29Z dg43tfdfdgfd