नवी दिल्ली: मुंबई इंडियन्स व लखनौ सुपरजायंट्स या दोन्ही संघासाठी आजची आरपारची लढाई असणार आहे. कारण प्लेऑफमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी आता मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याची चिंता वाढली आहे. कारण लखनौच्या संघात आता मॅचविनर खेळाडूची एंट्री झाली आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ सध्याच्या घडीला पराभवाच्या छायेत आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाला विजयाच्या वाटेवर कसे आणायचे, याचा विचार कर्णधार हार्दिक पंड्या करत असेल. पण या सामन्यापूर्वी लखनौच्या संघाने मुंबईला मोठा धक्का दिला आहे. हा सामना सुरु होण्यापूर्वीच लखनौच्या संघात एका दमदार खेळाडूचा प्रवेश झाला आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स असा सामना आज होणार आहे ज्यात मुंबईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी सामना जिंकणे महत्त्वाचे असणार आहे. मुंबईकडून बुमराहची गोलंदाजी पहायला मिळणार, तर लखनौकडून मयंक यादव गोलंदाजी करायला उतरणार आहे. मयंक यादव आता तंदुरुस्त असल्याकारणाने तो आजचा सामना खेळणार असल्याचे सांगितले जात आहे. लखनौचा मॅच विनर खेळाडू मयंक यादव पुन्हा संघात परतल्याने लखनौ संघासाठी ही एक चांगली बातमी आहे. मयंक यादवच्या येण्याने मुंबई इंडिन्सची चिंता मात्र वाढली आहे.
आयपीएल गुणतालिकेत लखनौ सुपरजायंट्स पाचव्या क्रमांकावर आहे तर मुंबई इंडियन्स नवव्या स्थानावर.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-04-30T13:13:34Z dg43tfdfdgfd