गयाना : इंग्लंडने भारताविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये दमदार फलंदाजी करायला सुरुवात केली होती. त्यावेळी इंग्लंड हा सामना जिंकेल, असे वाटत होते. पण त्याचवेळी भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी समालोचन करताना एक गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट रोहितने दुसऱ्याच मिनिटाला केली. त्यानंतर भारतीय संघ हा सामना जिंकायला लागला.
इंग्लंडचा सलामीवीर भारताच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवत होता. अर्शदीप सिंगच्या तिसऱ्या षटकात तर बटलरने जोरदार आघाडी उघडली होती. त्यानंतर चौथ्या षटकात रोहित हा जसप्रीत बुमराहला गोलंदाजी देईल, असे सर्वांना वाटत होते. पण मैदानात मात्र तसे घडले नाही.
रोहित शर्माने यावेळी शिफारीने संघाचे नेतृत्व केले. भारताची धावसंख्या जास्त मोठी नक्कीच नव्हती. पण रोहितने यावेळी गोलंदाजीत चांगला बदल केला. अक्षरने यावेळी आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला. अक्षरला कुलदीपची चांगली साथ मिळाली आणि या दोघांनी इंग्लंडचे कंबरडे मोडले.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-06-28T14:23:46Z dg43tfdfdgfd