मुंबई: टी-२० वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी दाखवल्यानंतर टीम इंडियाने सुपर-८ची फेरी गाठली आहे. १९ जूनला भारताचा सुपर-८ मधील पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार आहे. बार्बाडोस येथे भारतविरुद्ध अफगाणिस्तान आमने सामने येणार येणार आहेत आता याच पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने आपले स्पष्ट मत मांडले आहे.
"जेव्हा विकेटवर वेग नसतो आणि समोरच्या जरी तुमचा खेळ माहित असेल तरी तुम्हाला तुमचा डाव कसा पुढे करायचा आहे हे ठरवावे लागेल,आम्ही अमेरिकेमध्ये जे पाहिले त्यापेक्षा येथील सराव विकेट खूपच चांगली आहे."सूर्यकुमार यादव म्हणाला. न्यूयॉर्कच्या अवघड खेळपट्टीवर सूर्यकुमारने अमेरिकेविरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावले होते. अमेरिकेविरुद्ध सामन्यात सलामी जोडी खेळपट्टीवर जास्त टिकू शकली नाही तर तीन विकेट लवकर पडल्यानंतर सूर्यकुमारने सावध खेळी करत ४९ चेंडूत नाबाद ५० धावा करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
सेंट लुसियामध्ये भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध रंगेल तर शेवटचा सामना अँटिग्वा येथे भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया असा रंगणार आहे. न्यूयॉर्कच्या अवघड खेळपट्टीनंतर भारताला कॅरेबियन खेळपट्ट्यांवर सामने खेळावे लागणार आहेत. सुपर-८ मध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो यावर आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे तर सर्वाधिक लक्ष हे विराट कोहलीच्या खेळीकडे असणार आहे. वर्ल्डकपमधील तीन सामन्यात विराट केवळ ५ धावाच करू शकला तर एक सामना टीम इंडियाचा पावसामुळे वाहून गेला.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-06-20T09:33:02Z dg43tfdfdgfd