GAUTAM GAMBHIR: गौतम गंभीर मुख्य कोच होताच भारतीय संघातून ४ दिग्गजांना मिळणार नारळ; BCCI मान्य केल्या या ५ अटी

नवी दिल्ली: आयसीसी टी-२० वर्ल्डकप खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघासाठी मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी भारताचा माजी सलमीवीर गौतम गंभीर याची निवड जवळ जवळ निश्चित झाली आहे. संघाचे विद्यमान कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी-२० वर्ल्डकपनंतर संपणारआहे. त्यामुळे बीसीसीआकडून जूनच्या अखेरच्या आठवड्यात नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली जाऊ शकते.

गंभीरने बीसीसीआयला घातलेल्या ५ अटी

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार गौतम गंभीरने कोच होण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. बीसीसीआयला देण्यात आलेल्या या अटी मान्य झाल्यानंतर त्याने प्रशिक्षकपदासाठी होकार दिला आहे. देशाला २००७ आणि २०११ साली वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमीका बजावणाऱ्या गंभीरच्या अटी काय आहेत ते जाणून घ्या...

- भारतीय क्रिकेट संघावर संपूर्ण नियंत्रण

- सपोर्ट कोचिंग स्टाफ निवडण्याचे स्वातंत्र्य

- CT25 सिनिअर खेळाडूंना अखेरची संधी

- भारताचा कसोटी संघ पूर्णपणे वेगळा

- २०२७ साली होणाऱ्या वर्ल्डकपसाठी रोड मॅप तयार

गंभीर आल्यानंतर ४ खेळाडूंची सुट्टी

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने १० वर्षानंतर विजेतेपद मिळवले. २०१४ नंतर केकेआरने प्रथमच आणि एकूण तिसरे विजेतेपद मिळवले. आता गंभीर भारतीय संघाचा कर्णधार झाल्यानंतर हे मात्र निश्चित आहे की टीममध्ये मोठे बदल होतील. गंभीर हा आक्रमक स्वभावाचा खेळाडू आहे आणि त्याच्या मार्गदर्शन देखील त्याच प्रकारचे आहे. त्यामुळे भारतीय संघातून ४ खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

१) विराट कोहली- भारतासाठी तिनही फॉर्मेटमध्ये धावांचा डोंगर उभारणाऱ्या विराट कोहलीचा समावेश देशाच्या सर्वकालीन फलंदाजांमध्ये होतो. २००८ साली आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात करणाऱ्या विराटने भारताला अनेक मॅच जिंकून दिल्या आहेत. गंभीरच्या मते विराटने आता फक्त वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळावी. टी-२० संघात नव्या खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे.

२) रोहित शर्मा- भारताचा विद्यमान कर्णधार रोहितने २००७ साली पदार्पण केले होते. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितकडे जबाबदारी देण्यात आली. सध्या रोहित कसोटी, वनडे आणि टी-२०चे नेतृत्व करतो. पण गेल्या काही वर्षात त्याची टी-२० मधील कामगिरी चांगली झालेली नाही. गंभीर कोच झाल्यानंतर रोहितला तिनही फॉर्मेटमध्ये खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

३) रविंद्र जडेजा- गेल्या अनेक वर्षापासून फार खास कामगिरी न करता येथील जडेजाची निवड केली जात आहे. २०२२चा टी-२० वर्ल्डकप, २०२३चा वनडे वर्ल्डकप आणि आता सुरू असलेला टी-२० वर्ल्डकपसह अनेक मोठ्या स्पर्धेत जडेजाने निराश केले आहे. ऑलराउंडर जडेजा फक्त कसोटी क्रिकेट ते ही भारतात खेळू शकतो. गंभीरच्या कार्यकाळात जर तो अपयशी ठरला तर जडेजाचे करिअर संपू शकते.

४) मोहम्मद शमी- गंभीरच्या कार्यकाळात डच्चू मिळण्याची शक्यता असलेला खेळाडू म्हणजे शमी होय. भारतीय जलद गोलंदाजांसाठी गंभीरकडे स्पष्ट योजना आहे. गंभीरच्या मते शमीने सातत्याने कसोटी क्रिकेट खेळावे. त्याच बरोबर गंभीरची नजर २०२७च्या वनडे वर्ल्डकपवर आहे. अशात वर्ल्कलोड मॅनेजमेंटचा विचार करता शमी टी-२० संघातून बाहेर होऊ शकतो.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-17T09:56:58Z dg43tfdfdgfd