मुंबई: टी-२० वर्ल्डकप मधील अतिशय रंजक सामना भारत-पाक यांच्यात रंगला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर ही बहुचर्चित लढत पार पडली. भारताने पाकिस्तानच्या हातातून सामना हिसकावत विजय मिळवला तर या विजयामध्ये महत्वाची भूमिका ही गोलंदाजांची होती. भारतीय फलंदाजांना या सामन्यात विशेष कामगिरी करता आली नाही ऋषभ पंतला वगळता. सामना जिंकल्यानंतर मोहम्मद सिराजने एक व्यक्तव्य केले आहे त्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
भारतविरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला विशेष कामगिरी करता आली नाही. भारतासाठी एक एक धाव तेव्हा महत्वाची ठरत होती मोहम्मद सिराजने नाबाद सात धावा केल्या तर त्याच सात धावांची मदत टीम इंडियाला सामना जिंकण्यासाठी झाली. सिराजने सात धावा केल्याने संघाला सामना जिंकण्यासाठी मदत झाल्याने सिराजने आता आनंद व्यक्त केला आहे.
भारतविरुद्ध पाक सामन्यात भारताने केवळ सहा धावांनी विजय पटकवला. भारतीय फलंदाजांना उल्लेखनीय कामगिरी करता आला नाही, केवळ ऋषभ पंतने सर्वाधिक ४२ धावांची खेळी खेळली. अक्षर पटेल आणि ऋषभने मिळून दमदार भागीदारी करत मजबूत धावसंख्या उभारण्यात योगदान दिले, त्याबद्दल चहलने या व्हिडीओमध्ये त्यांच्या खेळीचे कौतुक केले तर ते म्हणाले "आम्ही खेळीचा जास्त विचार केला नव्हता जसे वाटले तसे खेळलो, तर पंतने सिराजच्या फिल्डिंगचे कौतुकही केले".
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-06-12T07:53:08Z dg43tfdfdgfd