मुंबई: टी-२० वर्ल्ड कपच्या मोहिमेला आता सुरुवात झाली असून टीम इंडियाची पहिली लढत आयर्लंडविरुद्ध ५ जूनला रंगणार आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामनापार पडणार असून या पीचवर गोलंदाजांची उत्तम कामगिरी पाहायला मिळतेय त्यामुळे आता अशा परिस्थितीत भारताची playing xi कशी असेल असा प्रश्न चाहत्यांच्या मनात असताना रोहितने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, भारताच्या पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली या परिषदेत रोहित शर्माने पीच आणि टीम संयोजनाबाबत काही गोष्टी सांगितल्या तर playing xi कशी असणार आहे त्याबद्दल त्याने सांगितले आहे. रोहित म्हणाला, "टीम इंडिया ४ स्पिनर्ससोबत मैदानात उतरणार की नाही ते अजूनही सिक्रेट असणार आहे तर आमच्याकडे दोन स्पिनर्स आणि दोन ऑलराऊंडर आहेत, यामध्ये कुलदीप, युझवेंद्र यांच्याशिवाय जडेजा आणि अक्षरसारखे खेळाडू आहेत तर त्यामुळे टीमचा समतोल साधायचा असेल तर तुमच्याकडे ऑलराऊंडर खेळाडू असणं आवश्यक आहे.
रोहित शर्मा पुढे म्हणाला, "या चौघांची भूमिका या वर्ल्डकपमध्ये कशी महत्त्वाची असेल, याबद्दल आम्ही अजून विचार केलेला नाही, जशी परिस्थिती समोर येईल त्यानुसार आम्ही निर्णय घेणार आहोत, या चारही खेळाडूंना योग्यरितीने संधी मिळेल यावरच आमचा भर असणार आहे, या चौघांना एकाच सामन्यात खेळायची संधी मिळाली तर ते उत्तमच आहे, मात्र तसं नाही झालं तर आम्ही त्यासाठी काहीतरी वेगळा मार्ग शोधून काढू".