एकच चेंडू ठरला मुंबईच्या पराभवाचा टर्निंग पॉइंट, पाहा नेमकं घडलं तरी काय...

जयपूर : मुंबई इंडियन्सच्या संघाने राजस्थानविरुद्धचा सामना गमावला खरा, पण या सामन्यात त्यांना विजयाची संधी आली होती. कारण यावेळी एकच चेंडू मुंबई इंडियन्सच्या पराभवाचा टर्निंग पॉइंट ठरला.

ही गोष्ट घडली ती १० व्या षटकात. मुंबईसाठी ही षटक पीयुष चावला टाकत होता, तर त्याच्यासमोर होता तो यशस्वी जैस्वाल. या १० षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. यशस्वी यावेळी चांगल्या फॉर्मात होता. त्यामुळे त्याला बाद करण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ आसूसलेला होता. यशस्वीला बाद करण्यासाठी हार्दिक पंड्याने फिरकी गोलंदाजांला संधी दिली होती. यामध्ये मुंबईचा मोहम्मद नबी यशस्वीला बाद करण्यात अपयशी ठरत आहे, हे दिसताच त्याने पीयुषला संधी दिली. १० व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर यशस्वीला पीयुषने चांगला चेंडू टाकला होता. पण यशस्वी चांगल्या फॉर्मात होता आणि त्याने या चेंडूवर मोठा फटका मारला. हा चेंडू आता षटकार जाणार का, याची उत्सुकता सर्वांना होती. पण यशस्वीने जिथे फटका मारला तिथे मुंबई इंडियन्सचा नेहाल वधेरा क्षेत्ररक्षण करत होता. फलंदाजी करताना वधेराने ४९ धावांची महत्वूपर्ण खेळी साकारली होती. त्यामुळे आता वधेरा पुन्हा मुंबईसाठी धावून येणार असे वाटत होते. यावेळी यशस्वीने मारलेला चेंडू वधेराच्या हातात विसावणार, असे दिसत होते.

हा चेंडू वधेराच्या हातामध्ये आला. यशस्वी आता बाद होणार आणि मुंबईचा संघ विजयाच्या दिशेने कूच करणार, असे त्यांच्या चाहत्यांना वाटत होते. पण त्यावेळी वधेराला आपण कुठे उभे आहोत आणि सीमारेषा नेमकी किती जवळ आहे, याचा अंदाज आला नाही. त्यामुळे वधेराचा यावेळी गोंधळ उडला. हा गोंधळ उडाल्यावर वधेराच्या हातून हा सोपा झेल सुटला आणि यशस्वीला जीवदान मिळाले. यशस्वीचा झेल तर सुटलाच पण त्याला षटकारही मिळाला. त्यामुळे यशस्वी ५६ धावांवर पोहोचला. या जीवदानानंतर यशस्वीचे मनोबल चांगलेच उंचावले. पण मुंबईसाठी हा चेंडू सर्वात महत्वाचा होता. कारण या चेंडूवर जर यशस्वीचा झेल पकडला गेला असता तरी कदाचित या सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता. पण वधेराने यावेळी मोठी चूक केली आणि त्याचा फटका मुंबईच्या संघाला मोठ्या प्रमाणात बसला. कारण या जीवदावानंतर यशस्वीने जोरदार फटकेबाजी केली आणि आपले शतकही पूर्ण केले.

यशस्वीला मिळालेले जीवदान हे मुंबईसाठी चांगलेच भारी पडले. त्यामुळे हा चेंडू मुंबईच्या पराभवाचे कारण ठरला. जर यशस्वी यावेळी बाद झाला असता तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-22T19:03:55Z dg43tfdfdgfd